शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अण्णा हजारेंशी सकारात्मक चर्चा- गिरीश महाजन यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 20:29 IST

अमित शहा यांच्या सूचनेवरुन मध्यस्थी

ठळक मुद्देनिवडणूक सोडून धावावे लागले दिल्लीलागिरीश महाजन यांना मध्यस्थीचे अधिकार

जळगाव - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरु केलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावे यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिल्ली येथे प्रयत्न सुरु केले आहे.. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु असून येत्या एक- दोन दिवसात अण्णा आपले हे आंदोलन मागे घेतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गिरीश महाजन हे गेल्या महिनाभरापासून अण्णा हजारे यांच्या संपर्कात होते. परंतु अखेरच्या क्षणीही शिष्टाई होऊ शकली नव्हती. दरम्यान महाजन यांचा अण्णांशी असलेला संपर्क पाहता आंदोलनाबाबत समन्वय घडवून आणण्याची जाबाबदारी महाजन यांच्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोपवली आहे. यानुसार शहा यांना शनिवारी अचानक निरोप येताच ते रात्रीच जामनेर येथून दिल्लीकडे रवाना झाले आणि सकाळी 11 वाजता दिल्लीत पोहचल्यावर त्यांनी समन्वयासाठी प्रयत्न सुरु केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ‘लोकमत’ ला दूरध्वनीवर बोलताना दिली. निवडणूक सोडून धावावे लागले दिल्लीला महाजन यांच्या गावात म्हणजेच जामनेर येथे नगरपालिकेची निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या प}ी साधना महाजन या रिंगणात आहेत. याचबरोबर सोमवारी माघारीची अखेरची मुदत असल्याने गिरीश महाजन हे दोन - तीन दिवस मतदार संघातच थांबणार होते, मात्र, शनिवारी रात्री अचानक अमित शहा यांचा फोन आल्याने ते तातडीने दिल्लीत दाखल झाले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गिरीश महाजन यांना मध्यस्थीचे अधिकार दिले आहे. दरम्यान अण्णांच्या काही मागण्या मान्य करण्याची सरकारची भूमिका असून काही मागण्यांवर चर्चा सुरु आहे, लवकरच तोडगा निघेल असेही महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव